Modi Awas gharkul yojna प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचा मोठा निर्णय हा घेतलेला आहे. आता या योजनेत थोडा बदल करून या योजनेअंतर्गत सर्वसामान्य लोकांना घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मित्रांनो आताच आलेल्या माहिती नुसार आता या योजनेचे नवीन अर्ज सुरू झालेले आहे आणि या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे २८ फेब्रुवारी रोजी पासून हे अर्ज सुरू असून त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे आणि या साठी अर्ज कोठे करायचे आहेत ही संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये घेणार आहोत.
Modi Awas gharkul yojna 2024 या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येईल. तसेच घरकुल बांधण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शासनाची असेल. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पूर्वीप्रमाणे कच्च्या झोपड्यांमध्ये राहावे लागणार नाही. या साठी केंद्र सरकार या साठी प्रयत्न करत आहे.
Modi Awas gharkul yojna या योजनेसाठी अर्ज पात्रता काय आहे ते पहा
- महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी या योजनेखाली घर बांधण्यासाठी पात्र ठरतील. यासाठी लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षे असणे आवश्यक आहे.
- तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थ्यांकडे जमीन असणे किंवा त्यांचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा. या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच या घरकुल योजनेचा लाभ मिळू शकेल.
Modi Awas gharkul yojna या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत सर्वात आधी आपल्याला नोंदपत्र किंवा उतारा
अ) ज्या कुटुंबात कोणीही कमाऊ व्यक्ती नाही अशा विधवा, परित्यक्ता महिला आणि कुटुंबप्रमुखांना प्राधान्य.
ब) पूरग्रस्त किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने बाधित लाभार्थ्यांना प्राधान्य.
क) जातीय दंगलीत घराचे नुकसान झालेल्या व्यक्तींना प्राधान्य.
ड) दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य – किमान ५% जागा दिव्यांगांसाठी राखीव.
इ) इतर पात्र गरीब कुटुंबे.
याप्रमाणे गरज आणि पात्रतेवर आधारित प्राधान्यक्रम निश्चित करून लाभार्थी यादी तयार करावी.